Mumbai : MMRमध्ये नव्या 'ॲक्सेस कंट्रोल' मार्गाची चाचपणी; मुंबईसह कोठूनही 15 मिनिटात बाहेर पडणे शक्य

MMR
MMRTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरमधील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर ही सर्व शहरे महामार्गाशी थेट जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची चाचपणी केली जात आहे. प्रस्तावित 'नवी मुंबई एनएच - ३ व्हाया कल्याण बदलापूर ॲक्सेस कंट्रोल मार्गा'मुळे शहरातून बाहेर पडण्यासाठी फक्त १०-१५ मिनिटे लागतील अशाप्रकारे याचे नियोजन केले जात आहे. शहरांतर्गत वाहतुकीला सक्षम पर्याय म्हणून पूर्व भाग ॲक्सेस कंट्रोल मार्गाने तर पश्चिम भाग मल्टीमॉडल कॉरिडॉरने जोडला जाणार आहे.

MMR
Mumbai : महापालिकेच्या 'या' खात्यात 330 कोटींचा टेंडर घोटाळा; मर्जीतील ठेकेदाराला रेड कार्पेट

कल्याण लोकसभा मतदारसंघातील वाहतूक व्यवस्थेला गती देण्यासाठी अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. यापैकीच एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे ''नवी मुंबई एनएच - ३ व्हाया कल्याण बदलापूर ॲक्सेस कंट्रोल मार्ग''. या मार्गाच्या उभारणीबाबत एमएमआरडीए आयुक्त संजय मुखर्जी यांच्या उपस्थितीत नुकतीच एमएमआरडीए मुख्यालयात एक महत्वाची बैठक पार पडली. यावेळी खासदार डॉ श्रीकांत शिंदे उपस्थित होते. या बैठकीत या मार्गाच्या उभारणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली असून हा मार्ग गतीने उभारण्याबाबत सूचना करण्यात आलेल्या आहेत. प्रकल्पाअंतर्गत बदलापूर, उल्हासनगर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली या शहरांना थेट मुंबई तसेच नवी मुंबई या शहरांशी जोडता येईल अशा पद्धतीने मार्गाची उभारणी करण्याचे प्रस्तावित आहे. या मार्गाच्या रुट बाबत ''टाटा कन्सलटींग इंजिनियर'' कंपनीने सूचविलेल्या अनेक पर्यायांवर बैठकीत तज्ज्ञांशी संवाद साधण्यात आला.

MMR
Mumbai-Ahmedabad Bullet Train : मार्गावरील 'त्या' महत्त्वाकांक्षी पुलाचे मिशन सक्सेस

टाटा मार्फत यावेळी बदलापूर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ( तुर्भे - तळोजा - उसाटने आणि खारघर - तुर्भे लिंक रोड ) हा रुट ॲक्सेस कंट्रोल मार्गासाठी चांगला पर्याय असल्याचे सांगण्यात आले.

असा आहे मार्ग -
-
बदलापूर येथून जात असलेल्या मुंबई वडोदरा राष्ट्रीय महामार्गाच्या येथून या रस्त्याची सुरुवात होणार आहे.
- या मार्गावरून पुढे जात पालेगाव येथे मार्गाला पहिला इंटरचेंज असणार आहे. याद्वारे नागरिकांना अंबरनाथ शहरात तसेच काटई बदलापूर मार्गावर जाता येणार आहे.
- यापुढे हा मार्ग कल्याण पूर्वेतून जात असून मार्गावर हेदुटणे येथे दुसरा इंटरचेंज देण्यात आला आहे. या मार्गावरील हा अत्यंत महत्वाचा हा इंटरचेंज असून येथून वाहनचालकांना मेट्रो - १२ च्या हेदुटणे स्थानकात जाता येणार आहे. तसेच येथून कल्याण रिंग रोडची कनेक्टिव्हीटी या मार्गावरून असणार आहे. कल्याण - शिळफाटा मार्गावर देखील येथून जाता येणार आहे.
- यापुढे शिरढोण येथे या रस्त्यावरून मल्टी मॉडेल कॉरिडोअर मार्गाला जाता येणार आहे. या मल्टिमॉडेल कॉरिडोर रस्ता उभारणीचे काम देखील जलदगतीने सुरु आहे. या या मल्टिमॉडेल कॉरिडोर रस्त्यामुळे थेट पुढे मुंबई पुणे एक्सप्रेसवे येथे जाणार आहे. तर हाच मल्टिमॉडेल कॉरिडोर सीटीएस कोस्टल रोडलाही जोडला जाणार असून याद्वारे थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गाठणे सोपे होणार आहे.

MMR
Mumbai News : मुंबईत दर्जेदार रस्त्यांसाठी महापालिकेचा चक्रव्यूह; काय आहे नवा प्लान? 

शिरढोण येथे तिसरा इंटरचेंज असल्याने कल्याण येथील २७ गावे याठिकाणी जोडली जाणार आहेत. तर उसाटणे येथून जाणाऱ्या राज्य महामार्गाला याची कनेक्टिव्हीटी असणार आहे. उसाटणे येथील रस्त्याचे काम देखील प्रगतीपथावर आहे. मुंबई - पनवेल हायवेला देखील या मार्गाची जोडणी करण्यात येणार असून नागरिकांना पनवेल येथे जाणे सोपे होणार आहे. तर पुढे हा मार्ग खारघर तुर्भे लिंक रोडला थेट जोडण्यात येणार आहे. या लिंक रोडची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून प्रत्यक्ष उभारणीचे काम देखील लवकरच सुरु होणार आहे. या लिंक रोड द्वारे थेट नवी मुंबई शहरात जाता येणार आहे तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे जाता येणार आहे.

प्रकल्पाचे फायदे -
- हा संपूर्ण मार्ग ॲक्सेस कंट्रोल असून ग्रीन फिल्ड मार्ग असणार आहे.
- बदलापूर येथून मुंबई वडोदरा राष्ट्रीय महामार्गाला हा रस्ता जोडला जाणार असून याद्वारे नागरिकांना समृद्धी महामार्गाला जाता येणार आहे.
- तर समृद्धी महामार्गाद्वारे पुढे मुंबई - आग्रा हायवे येथे थेट जाता येणार आहे. यामुळे नाशिकच्या दिशेने प्रवास करता येणार आहे.
- या मार्गामुळे शहरांतर्गत होणारी वाहतूक थांबणार असून शहराच्या बाहेरून वाहने प्रवास करणार. यामुळे शहरातील वाहतूक जलदगतीने होईल आणि इतर शहरांमध्ये जाण्यासाठी एक जलद पर्याय उपलब्ध होईल.
- या मार्गाच्या उभारणीनंतर बदलापूर ते डोंबिवली येथील वाहनचालकांना कोणत्याही अडथळ्यांशिवाय थेट मुंबई आणि नवी मुंबई गाठता येणार आहे. तसेच इतर जिल्ह्यात जाणाऱ्या महामार्गांवर देखील सहजतेने जाणार आहे. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com