Pune : खडकवासला ते फुरसुंगी बोगद्यातून पाणी नेण्याच्या प्रकल्प लागणार मार्गी; टेंडर प्रक्रिया सुरू

Water Tunnel
Water TunnelTendernama
Published on

पुणे (Pune) : पुणे शहराला अतिरिक्त पाणी पुरवठा उपलब्ध करून देणारा आणि शेतीलाही पुरेसा पाणीपुरवठा करणे शक्य होणाऱ्या खडकवासला धरण ते फुरसुंगी या दरम्यान बोगद्यातून पाणी नेण्याच्या प्रकल्पाच्या कामासाठी जलसंपदा विभागाकडून टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. टेंडर भरण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागण्याच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल पडल्याचे मानले जात आहे.

Water Tunnel
भूखंडाचे श्रीखंड! बावनकुळे अध्यक्ष असलेल्या संस्थेला नागपुरातील मोक्याचा 5 हेक्टर भूखंड देण्याचा घाट

राज्य सरकारकडून पाच सप्टेंबर रोजी या प्रकल्पाच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. त्यानंतर जलसंपदा विभागाने तातडीने या कामासाठीची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. प्रकल्पासाठी दोन हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च अपेक्षित असताना सुमारे १६०० कोटी रुपयांचे टेंडर मागविण्यात आले आहेत, असे जलसंपदा विभागाच्या वतीने सांगण्यात आले. खडकवासला धरण ते फुरसुंगीदरम्यान २८ किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून पाणी नेण्याची योजना जलसंपदा विभागाकडून तयार करण्यात आली आहे. जलसंपदा विभागानेच तयार केलेल्या या प्रकल्पाच्या विस्तृत प्रकल्प अहवालास मुख्य अभियंता आणि त्यांनतर राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीने (स्टेट लेव्हल टेक्निकल अ‍ॅडव्हायजरी कमिटी) यापूर्वीच मान्यता दिली आहे. या प्रकल्पामुळे सुमारे अडीच टीएमसी (अब्ज घनफूट) पाण्याची बचत होणार आहे. तर अतिरिक्त ३ हजार ४७२ हेक्टरवरील क्षेत्राला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.

Water Tunnel
Ajit Pawar: ...तर पुणे मेट्रोला दणका देण्यास मागे पुढे पाहणार नाही!

या प्रकल्पासाठी एशियन डेव्हलपमेंट्‌स बँकेने कर्ज देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यानुसार जलसंपदा विभागाकडून २२०० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करून बँकेला सादर केला आहे. तर दुसरीकडे कालवा बंद करून रिकामी होणारी जागा महापालिकेने ताब्यात घ्यावी आणि त्या मोबदल्यात टीडीआर द्यावा, असा प्रस्ताव जलसंपदा विभागाने महापालिकेकडे सादर केला आहे. त्यामुळे सर्व प्रकाराच्या मान्यता मिळाल्यानंतरच अंतिम मान्यतेसाठी हा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे प्रलंबित होता. प्रस्तावास मान्यता मिळाल्यामुळे प्रकल्पाचे काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रत्यक्षात प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर तो पूर्ण होण्यास किमान तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे.

काय आहे प्रकल्प

७.८० मीटर रुंद, ३.९० मीटर उंच आणि १.९५० मीटर गोलाकार उंची अशा ‘डी’ आकाराच्या बोगद्यातून खडकवासला ते फुरसुंगी दरम्यान बोगद्यातून पाणी नेण्याचे जलसंपदा विभागाकडून निश्‍चित करण्यात आले आहे. सुमारे २८ किलोमीटर लांबीचा हा बोगदा असणार आहे. या बोगद्यामुळे कालव्याची क्षमता १५१० क्युसेक्स होणार असून, ते सर्व पाणी गुरुत्वाकर्षण शक्तीने फुरसुंगीपर्यंत नेण्यात येणार आहे. त्यामुळे पाण्याचे प्रदूषण, गळती आणि बाष्पीभवन रोखण्यास मदत होऊन अडीच टीएमसी पाणी वाचणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com